Thursday, August 18, 2016

भारतातील पहिली सौर उर्जेवर चालणारी रेल्वे



भारतीय रेल्वेने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. नुकतेच भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागाने सौर उर्जेवर चालणाऱ्या प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली. हि चाचणी रेल्वेच्या जोधपूर विभागात घेण्यात आली. या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे अनेक टन कार्बन वायूच्या उत्सर्जनात घाट होणार आहे.